वणी टाईम्स न्युज: शेतकरी कर्जमाफी, दिव्यांग व विधवा भगिनींसाठी नियमित अनुदान व शेतमालाला हमी भावाच्या पलिकडे प्रोत्साहन रक्कम मिळावी यासारख्या मागण्यांसाठी आज वणी तालुक्यातील चिखलगाव येथील यवतमाळ रोडवरील लालपुलिया परिसरात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक व अचलपूरचे माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.
या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अजय पांडुरंग धोबे यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती संघटनाचे अनिकेत चामाटे, शेतकरी संघटनाचे देवराव धांडे, दशरथ पाटील, मोबीन शेख, रघुवीर कारेकर, आशीष रिगोले, आशीष तुपटकर, मुन्ना येरेकर व कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलकांनी आपल्या मागण्या अत्यंत शांततामय आणि लोकशाही मार्गाने मांडल्या. या पार्श्वभूमीवर पोलीस व महसूल प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवत कायदा व सुव्यवस्था राखली. आंदोलनकर्त्यांनी शासनाकडे मागण्यांचा तात्काळ व सकारात्मक विचार करून निर्णय घ्यावा अशी एकमुखी मागणी केली.
✍🏻 — वणी टाईम्स डिजिटल न्यूज
(ताजा घडामोडी | स्थानिक बातम्या | तुमच्या हक्काचा आवाज)











