वणी टाईम्स न्युज : पहलगाम हल्ल्यानंतर बदला म्हणून भारताने बुधवारी पहाटे पाकिस्तान अधिकृत काश्मीर क्षेत्रात मोठी सर्जिकल स्ट्राईक करत शेकडो दहशतवाद्यांना कंठस्नान घातला. लष्कराच्या विशेष कमांडो पथकाने आणि हवाई दलाच्या मदतीने ही सर्जिकल स्ट्राइक स्वरूपातील केलेल्या या कारवाईला “ऑपरेशन सिंदुर ” असं नाव देण्यात आलं होतं. वायुसेनेच्या विमानांनी दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ला करून 100 दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा केला आहे.

भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानकडून प्रत्युत्तर लक्षात घेऊन भारतीय सेना सज्ज ठेवण्यात आली आहे. पाकिस्तान सीमेलगत क्षेत्रात नागरिकांना अलर्ट करण्यात आले आहे. तसेच देशातील अंतर्गत सुरक्षा वाढविण्यात आली आहे.










