वणी टाईम्स न्युज | रायगड किल्ला येथे संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त वणी येथील शिवसैनिकांनी स्वच्छता अभियान राबवत प्रेरणादायी उपक्रम हाती घेतला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानीच्या पवित्र भूमीत झाडू हातात घेत कार्यकर्त्यांनी स्वच्छतेचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून समाजापुढे मांडला.

संत संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त “स्वच्छता हाच खरा धर्म” हा संदेश अधोरेखित करत रायगडाच्या पायथ्याशी परिसर स्वच्छ करण्यात आला. शिवरायांनी दिलेला स्वाभिमान, शिस्त आणि स्वराज्याचा आदर्श तसेच संत गाडगेबाबांनी दिलेला स्वच्छता, समाजप्रबोधन व अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार यांचा संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळाला.
या स्वच्छता अभियानात युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे, शहरप्रमुख राजू तुरणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य बंडू चांदेकर यांच्यासह नंदू ढूमने, दिवाकर नागतुरे, अरविंद कापसे, मनीष बतरा, परशुराम पोटे, चेतन उलमाले, मिलिंद बावणे, आदित्य नामेश बिलोरीया, श्रीकांत यशवंत उके, रौनक रवी बिलोरीया, सुयेश नगराळे, संजोग झाडे आणि तुषार दुरुटकर आदी शिवसैनिकांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
“गड स्वच्छ – विचार शुद्ध – समाज जागृत” हा संदेश देत केवळ जयंती साजरी न करता कृतीतून दोन महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. या उपक्रमामुळे रायगडाच्या पायथ्याशी स्वच्छतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण झाला असून उपस्थितांनी उपक्रमाचे स्वागत केले.










