वणी टाईम्स न्युज : कुदरती कहर कोणावर आणि कसं कोसळणार याचा पूर्वानुमान लावता येत नाही. शेतात चरत असताना अचानक वादळी वारा व पाऊस पडल्याने बकऱ्याचा कळपाने शेतात पळसाच्या झाडाखाली आसरा घेतला. मात्र त्या झाडावरच अचानक आसमानी वीज कोसळली. त्यामुळे झाडाखाली उभ्या 22 बकऱ्या जागीच ठार झाल्या.
ही दुर्देवी घटना मारेगाव तालुक्यातील नेत वरूड या गावात रविवारी सायंकाळी 4.30 वाजता दरम्यान घडली. या अपघातात बकऱ्या चारणारा युवक सुद्धा जखमी झाल्याची माहिती आहे. वीज कोसळून 22 बकऱ्या ठार झाल्यामुळे बकरी पालक भारत गेडाम याचा तब्बल दीड लाखाचा नुकसान झाला आहे. शासनाने पंचनामा करुन शेळी पालक यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.